37 घरांची पडझड : खानापूर तालुक्यातील एक शाळाही कोसळली : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
हवामान खात्याने राज्यामध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. बेळगाव जिह्यालाही यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आतापर्यंत जिह्यामध्ये पावसामुळे 37 घरांची पडझड झाली आहे. खानापूर तालुक्मयातील एक शाळाही कोसळली आहे. येत्या 72 तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील धरणांमधून अद्याप तरी पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाही. कोयना तसेच राजाराम जलाशयामधून पाणी सोडण्यात आले नाही. मात्र महाराष्ट्रात अधिक पाऊस झाला तर पाण्याचा विसर्ग होण्याची शक्मयता आहे. याचबरोबर जिह्यातील नद्यांही आता तुडूंब भरुन वाहत आहेत. मात्र अद्याप तरी पूर कोठेच आला नाही, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
पूरामुळे धोका निर्माण होणाऱया गावांना हलविण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. एनडीआरएफ पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. अतिवृष्टीबरोबरच नदी काठावरील गावांना पूर येण्याच्या शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. काही गावांना जिल्हाधिकाऱयांनी भेटी दिल्या आहेत. त्या ठिकाणी अधिकाऱयांना काही सूचना देखील केल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
हवामान खात्याने राज्यातील काही जिह्यांना रेडअलर्ट तर काही जिह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. बेळगाव जिह्याला यलो अलर्ट आहे. तर उडपी, कारवार, मंगळूर, कोडगु, चिक्कमंगळूर, शिमोगा आणि हासन जिह्याला रेडअलर्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वच जिह्यातील जिल्हाधिकाऱयांनी दक्षता घेतली आहे.
येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यान दिली आहे. रविवार दि. 10, 11, 12 आणि 13 या रोजी पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी येत्या तीन ते चार दिवसांत अधिक पडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱयांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.