एस. जयशंकर यांचे युएनएचसीमध्ये प्रतिपादन ः पाकिस्तानवर साधला निशाणा
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
दहशतवादासंबंधी ‘कुठल्याही स्थितीत सहन न करण्याच्या’ धोरणाला स्वीकारण्याचे आवाहन भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे. दहशतवादाची समस्या ही मानवाधिकारांचे सर्वात मोठे अक्षम्य उल्लंघन आहे. दहशतवाद घडवून आणणाऱयांना नेहमीच उत्तरदायी ठरविले जावे. मानवाधिकांवर प्रतिकूल प्रभाव पाडणाऱया दहशतवादाला सामोरा जाण्यास भारत सर्वात पुढे राहिला असल्याचे प्रतिपादन विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या 52 व्या अधिवेशनाला संबोधित करताना म्हटले आहे.
कोरोना महामारीमुळे लोकांच्या मानवाधिकारांच्या सुविधेवर प्रतिकूल प्रभाव पडल आहे. निरंतर विकास लक्ष्य प्राप्त करण्याच्या आमच्या सामूहिक प्रयत्नांना गंभीर स्वरुपात धक्का पोहोचला आहे. दहशतवादाला दृढपणे मुकाबला करण्याचे धोरण जगाने दाखवून द्यावे. दहशतवाद कुठल्याही स्थितीत योग्य ठरविला जाऊ शकत नाही. याचमुळे दहशतवादाला थारा देणाऱयांना नेहमी उत्तरदायी ठरविण्यात यावे असे जयशंकर म्हणाले. जयशंकर यांनी या संदेशात कुठल्याही देशाचे नाव घेतले नसले तरीही त्यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात पाकिस्तानलाच लक्ष्य केले आहे.
आमची राज्यघटना मूलभूत अधिकारांच्या स्वरुपात नागरी आणि राजकीय अधिकारांची हमी देते. आमची स्वतंत्र न्यायपालिका यासंबंधी स्वतःची अपेक्षित भूमिका बजावत आली असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. मानवाधिकारांच्या सार्वभौम घोषणेला 75 वर्षे आणि व्हिएन्ना घोषणा तसेच कृती कार्यक्रमाला 30 वर्षे पूर्ण झाल्याप्रसंगी जयशंकर यांनी सर्व मूलभूत मानवाधिकारांच्या सार्वभौमिकतेला अधोरेखित केले आहे.