प्रतिनिधी/ सातारा
शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी देशभरातून होत आहे. या मागणीसाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला सातारा जिह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अखिल भारतीय किसान सभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉमेड माणिक अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शेती मालाला उत्पादन खर्च व 50 टक्के नफा असा हमीभाव द्या अशी मागणी करण्यात आले. शेती वाचवा, शेतकरी वाचवा, देश वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आनंदी अवघडे व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.