परिसरातील नागरिकांचा टिप्परचालक-पोलिसांविरोधात असंतोष
वार्ताहर /अगसगे
अगसगे-बेळगाव रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. वाळू, खडी, माती, लहान दगड भरून भरधाव वेगाने टिप्पर चालविले जात आहेत. त्यामुळेच बुधवारी सायंकाळी बकऱयांच्या कळपामध्ये टिप्पर घुसून तीस बकऱयांचा जीव गेला. या घटनेत काही बकरी जखमीही झाली. या अपघातात सुदैवाने दोन मेंढपाळ मात्र सुदैवानेच बचावले आहेत. या घटनेनंतर पोलिसांच्या विरोधातच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि परिसरात शिवार आहे. त्यामुळे बकरी, जनावरे चारण्यासाठी धनगर आणि शेतकरी नेत असतात. रस्त्याच्या बाजूने त्यांना न्यावे लागते. अशावेळी भरधाव जाणाऱया टिप्पर आदी वाहनांमुळे मूक प्राण्यांना या वाहनांची धडक बसत आहे.
बेकायदेशीर वाहतुकीला पोलिसांचा वरदहस्त
याचबरोबर इतर वाहन चालकांनाही या भरधाव वाहतुकीचा त्रास होत आहे. अशा टिप्पर, ट्रक वाहनांनी धडक दिल्याच्या घटना घडल्या आहेत. या वाहतुकीला पोलीस आणि काही राजकीय व्यक्तींचा वरदहस्त आहे. बेकायदेशीर वाळू उपसा, माती वाहतूक, लहान दगड (बोर्डर), खडी वाहतूक असे प्रकार वाढले आहेत. पोलिसांना टिप्पर चालक हप्ता देऊनच ही वाहतूक करत आहेत, असा आरोप नागरिकांतून होत
आहे.
बुधवारी घडलेल्या या घटनेमध्ये मेंढपाळांचे सुमारे पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक मुक्मया प्राण्यांचा जीव या घटनेत गेला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. बऱयाच वेळा या टिप्पर चालकांना समज दिली तर काही वेळा त्यांना चोपही दिला आहे. काकती पोलीस स्थानकाकडेही तक्रार दिली आहे. असे असताना राजरोसपणे बेकायदेशीर वाहतूक सुरूच आहे.
या वाहतुकीमुळे नवीन रस्ता दोन ते तीन वर्षात खराब होत आहे. त्यामुळे या परिसरातील गावांना त्याचा मोठा फटका बसत आहे. दुचाकी किंवा इतर चार चाकी लहान वाहने या रस्त्यावरून चालविणे धोकादायक बनले आहे. बऱयाच वेळा हे चालक मागून येणाऱया वाहनांना पुढे जाण्यास वाटही देत नाहीत. काही वेळा टिप्पर लहान वाहनांना लागूनच वाहन रेटत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार किंवा इतर वाहनांना रस्त्यावरून वाहने बाजूला घ्यावी लागत आहेत. अशा वेळी मोटारसायकल घसरून पडण्याचे प्रकारही घडत आहेत. या अपघातात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
बेकायदेशीर वाळू-माती वाहतूक करणे गुन्हा
मध्यंतरी तर पोलिसांनी अशी वाहने जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे अवैध वाहतुकीला थोडी शिस्त लागली होती. मात्र, आता त्याच टिप्पर चालकांकडून हप्ता घेऊन वाहतूक करण्यास मुभा देणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काकती पोलीस स्थानकाचे बिट सांभाळणारे पोलीस कॉन्स्टेबल, हवालदार रस्त्यात थांबून ही वाहने अडवत आहेत. चिरीमिरी मिळाल्यानंतर त्या वाहनांना सोडून दिले जात आहे. काही वाहनमालक थेट काकती पोलीस स्थानकालाच हप्ता पुरवत असल्याची चर्चा सुरू आहे. त्या प्रकारामुळेच परिसरात बेकायदेशीर वाहतूक करणारी वाहने वाढली आहेत.
तेव्हा वरिष्ट पोलीस अधिकाऱयांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन या वाहतुकीवर निर्बंध घालावेत, तसेच अनेकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी होत आहे. या वाहतुकीवर निर्बंध घातले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील विविध गावच्या नागरिकांनी दिला आहे.
काकती पोलीसस्थानक कार्यक्षेत्रात अवैध धंद्यांना ऊत
काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. बेकायदेशीर वाहतूक, वाळू तस्करी, मटका-जुगार, गावठी आणि बनावट दारूविक्री करण्याचे प्रकार जोरात सुरू आहेत. पोलिसांना हप्ता द्यायचा आणि हवा तो अवैध धंदा सुरू करायचा, हा प्रकार वाढला आहे. कडोली परिसर, अगसगे परिसर, उचगाव परिसर, बेकिनकेरे, हंदिगनूर परिसर, काकती-होनगा परिसरात बनावट दारूची राजरोसपणे विक्री सुरू आहे. गांजाविक्री, जनावरे चोरून नेणे, ढाब्यांमध्ये दारूविक्री करणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे मारहाणीच्या घटनाही वाढल्या आहेत. पोलिसांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे हे घडत आहे, अशी चर्चा सुरू आहे.
एजंटांचा विळखा या पोलीस स्थानकामध्ये एजंटांचा वावर वाढला आहे. तंटे मिटविणे, जुगाऱयांना, दारूविक्री करणाऱयांना, टिप्पर चालकांना, अवैध धंदा करणाऱयांना पोलिसांशी हातमिळवणी करून सोडवून आणणारे एजंट वाढले आहेत. कुठल्याही गावामध्ये काही घटना घडल्यास त्या गावातील त्या एजंट व्यक्तीला कळविण्यात येते व प्रकरण मिटविण्यास, संशयित गुन्हेगाराला त्या एजंट व्यक्तीला बोलावून आणण्यास सांगतात व प्रकरणावर त्याचे पैशाचे आकडे ठरत असतात. पैशाची देवाण-घेवाण झाल्यावर त्यांना सोडून देण्यात येते. यामुळे या परिसरामध्ये गुन्हेगारीत वाढ झाली आहे.