प्रतिनिधी/ कागवाड
तालुक्मयातील केंपवाड येथील अथणी शुगर्सच्या 20 व्या गळीत हंगामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक योगेश पाटील, सुशांत पाटील यांनी गवानीत मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ केला. याप्रसंगी विधीवत पूजा करण्यात आली.
योगेश पाटील म्हणाले, गतवषी कारखान्याने साडेसहा लाख टन उसाचे गाळप केले आहे. यंदा 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱयांनी कारखान्याला मोठय़ा प्रमाणात ऊस पुरवठा कारवा. तसेच तालुक्मयातील शेतकरी, अधिकारी, कामगार व हितचिंतकांनी साथ देऊन यंदाचा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ऐनापूर केआरईएस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादा पाटील, संचालक राजेंद्र पोतदार, व्यवस्थापक बंडू जगताप, ए. आर. लटके, रेवण्णा पाटील, दिलीप पाटील, राजू चव्हाण, रमेश तेली यांच्यासह संचालक, सभासद उपस्थिती होते.