योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
सफाई कर्मचारी एका रिक्षामधून बेळगावकडे येण्याच्या तयारीत होते. यावेळी मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. यामध्ये 8 सफाई कर्मचारी जखमी झाले. कलखांब येथील या सफाई कर्मचाऱयांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नाही, असा आरोप सफाई कर्मचारी संघटनेने केला आहे. या सर्वांची भेट सफाई कर्मचारी पदाधिकाऱयांनी घेऊन त्यांची विचारपूस केली आहे.
शुक्रवारी सकाळी कलखांब येथून निघालेले इंदू नागाप्पा मेत्री (वय 45), गंगा कऱयाप्पा मेत्री (वय 42), शकुंतला मनोहर मेत्री (वय 36), रेणुका अर्जुन मेत्री (वय 40), सुंदर भोजप्पा कोलकार (वय 53), कल्पना मल्लाप्पा मेत्री (वय 45), अर्जुन नागाप्पा मेत्री (वय 57), गीता अशोक कोलकार (वय 37, सर्व रा. कलखांब) हे जखमी झाले आहेत. यामधील अर्जुन मेत्री, कल्पना मेत्री, गंगा मेत्री आणि लक्ष्मी मेत्री यांना गंभीर दुखापत झाली आहे.
महापालिका आणि कंत्राटदारांनी या सर्वांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे सर्वजण कंत्राटी पद्धतीने गेली अनेक वर्षे काम करत आहेत. तेव्हा याची दखल महापालिकेने घ्यावी आणि या सर्वांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, जनरल सेपेटरी विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी यांनी त्यांची भेट घेतली व विचारपूस केली..