नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्र सरकारने अफगाणिस्तामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ही बैठक होणार आहे. या बैठकीत तालिबानने सत्ता काबीज केलेल्या अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींबाबत परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती द्यावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
जयशंकर यांनी ट्विट केले, “अफगाणिस्तानमधील घडामोडी पाहता, परराष्ट्र राज्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाला राजकीय पक्षांच्या तळमजल्यांच्या नेत्यांना माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.”
या बैठकीत अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तयार केलेल्या योजनेसह त्या देशातील सध्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अमेरिकने सैन्य माघार घेताच आता तालिबानने काबुलमधील सर्व प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे विविध देशांतील नागरिकांची अफगाणिस्तान सोडण्यासाठी धडपड सुरु केली आहे. तर विविध देशांच्या सरकारने आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी विशेष विमानांची सोय केली आहे.