ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. त्याच लॉक डाऊन देखील जारी करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भीती आणि दडपण आहे आणि गोंधळ उडाला आहे.
मात्र, या अशा कठीण परिस्थितीत ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनते समोर येऊन सर्वांना धीर देत आहेत, त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या वागण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता अभिनेता रितेश देशमुख याने ही ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.
रितेश देशमुख आपल्या ट्विट मध्ये म्हणतो की, आपण सगळेजण एका अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहोत. करोना विषाणूबरोबरच आपण भीती, चिंता आणि अनिश्चिततेविरुद्ध देखील लढा देत आहोत. अशा काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत स्पष्टपणे आणि जिव्हाळ्यानं आपल्याशी नियमिपणे संवाद साधत आहेत. त्यांचं यासाठी आपण कौतुक केलं पाहिजे, असं आवाहन ही रितेशने यावेळी केले आहे.
मुख्यमंत्र्यांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या रितेशच्या या ट्विटला अनेकांनीच लाईक करत ते रिट्विटही केलं आहे. थोडक्यात, राज्याच्या नेतृत्त्वाला सर्वांनीच पाठिंबा दिला आहे असं चित्र आहे.