ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टने भारत आणि चीनमधील तणावग्रस्त परिस्थितीवर चिंता व्यक्त करत मंदिर उभारणीच्या कामाला तुर्तात स्थगिती दिली आहे. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे.
मिश्रा म्हणाले, भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे. या काळात देशाचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. सीमावादामुळे दोन्ही देशातील तणाव वाढल्याने राम मंदिर उभारणीच्या कामाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. 10 जूनपासून या कामाला सुरुवात झाली होती. मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देशातील परिस्थितीनुसार घेतला जाईल. त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी राम मंदिर ट्रस्टकडून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.