प्रतिनिधी / सातारा
शहरात अवजड वाहनांमुळे वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी ट्रक सारखी मोठी अवजड वाहने थांबवून व्यावसायिक आपल्या दुकानातील सामानाची उचल करत असतात. त्यामुळे वाहतुकीस मोठ्ठा अडथळा निर्माण होत असतो. त्यातच भर रस्त्यातून फेरीवाले जात असतात, त्यामुळे नागरिकांनी रस्त्यातून प्रवास तरी कसा करायाचा असा प्रश्न निर्माण होत आहे.
कित्तेक वेळा तासंतास ही अवजड वाहने एकाच ठिकाणी उभी करण्यात आलेली असतात. याचा त्रास मात्र इतरांना होत असतो. याचे गांभीर्य मात्र त्या संबंधीत व्यक्तीस जराही नसते. मुख्यतः अशा अवजड वाहनांना बाजारपेठे सारख्या मुख्य रस्त्यांवर दिवसा येण्याकरीता बंदी असते. पण या निमांना लाथाडून ही अवजड वाहने दिवसा बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर बिनदास्तपणे उभी असतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी आवजड वाहानांवर अंकुश कोणाचा असा असा प्रश्न निर्माण होत आहे. काही वेळा या अवजड वाहनाने वाहतूक कोंडी होऊन रूग्णवाहीका जाण्यास देखईल अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी वाहतूक विभागाने यावर योग्यती कारवाई करून तोडगा काढावा. किंवा या अवजड वाहनांना माल वाहतुकीसाठी केवळ रात्रीच्या वेळी तेही ठराविक वेळेत परवाणगी द्यावी, जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.