ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची भीती आणि युरोपियन देशांमध्ये वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
भारतीय नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाने यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकाच्या सुचनेनुसार नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाने 28 फेब्रुवारी 2022 रात्री 12 वाजेपर्यंत भारतातून आंतरराष्ट्रीय व्यावसायिक, प्रवासी सेवांचे निलंबन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भारत सरकारने एकीकडे नियमित उड्डाणांवर बंदी घालण्यात आली असली, तरी वंदेभारत मिशनच्या माध्यमातून मर्यादित संख्येने उड्डाणे केली जात आहेत. भारताने इतर देशांकडून नियमित उड्डाणांवर बंदी कायम ठेवली आहे, परंतु देशांतर्गत उड्डाणांची संख्या वाढत आहे. कोरोनापूर्व पातळीच्या तुलनेत भारतीय विमान कंपन्यांसाठी देशांतर्गंत उड्डाणांची संख्या 70 वरून 80 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.