ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. केंद्र सरकारने अनलॉक-4 साठी देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर नागरी उड्डाण संचालनालयाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने 23 मार्चपासून देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे. मात्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे ठरवण्यात आलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीला परवानगी दिली जाऊ शकते, असेही नागरी उड्डाण संचालनालयाने परिपत्रकात म्हटले आहे.