प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा आणि शरद पवारसाहेब हे एक वेगळेच नाते आहे. शरद पवारांच्या विचारांचा जिल्हा म्हणूनही आज सातारा जिह्याची ओळख आहे.कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे बेहाल सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवरही शरद पवार यांनी या वयात राज्याचा आढावा घेत आहेत. अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. उद्या ते रयत कौन्सिलच्या बैठकीच्या निमित्ताने साताऱयात येत आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिह्यातील राष्ट्रवादी अभिप्राय अभियानाचा लेंखाजोखा पदाधिकारी मांडण्याची शक्यता आहे. तशी तयारीही केली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर शरद पवार यांच्या विचारांना माणणारा सातारा जिल्हा आहे. जिह्यातील प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनावेळी राष्ट्रवादी अभिप्राय अभियान राज्यात राबवण्यात प्रारंभ केला आहे. सातारा जिह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यामध्ये सातारा जिल्हा प्रथम कसा राहिल यासाठी सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी झटत आहेत. तसेच लॉकडाऊनच्या कार्यकाळात सातारा जिह्यातील सर्वसामान्य नागरिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्याही त्यांच्यासमोर अभिप्राय अभियानाच्या माध्यमातून मांडल्या जात आहेत. शरद पवार हे शनिवारी सकाळी साताऱयात येत आहेत. त्यांच्याबरोबरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील हेही येत आहेत. त्यांच्या नियोजनामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यस्त होते.