भारतात येऊ घातलेल्या 5-जी तंत्रज्ञानाविरोधात न्यायालयात दाद मागणे जुही चावला या माजी चित्रपट अभिनेत्रीला चांगलेच महागात पडले आहे. तिची याचिका तर न्यायालयाने फेटाळलीच शिवाय न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याबद्दल 20 लाखांचा सणसणीत दंडही ठोठावला. जुही चावला हिने केवळ व्यक्तिगत प्रसिद्धीसाठी ही याचिका दाखल केली आणि न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालविला, अशी खरमरीत टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.
5-जी ही वायरलेस योजना असून ती मानवी प्रकृतीवर गंभीर परिणाम करते. तसेच पर्यावरणाला या तंत्रज्ञानापासून मोठा धोका असल्याचा दावा चावलांनी तिच्या याचिकेत केला होता. तिच्यासह वीरेश मलिक आणि टीना वाच्छानी यांनीही अशीच याचिका सादर केली होती. 5-जी योजना लागू झाल्यास पृथ्वीवर कोणीही माणूस, प्राणी अथवा पक्षी, कीटक व कोणताही जीव सुरक्षित राहणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. तथापि, यासंबंधीचा कुठलाही शास्त्राrय पुरावा सादर करणे याचिकाकर्त्यांना जमले नाही. त्यामुळे याचिका फेटाळण्यात आली. शिवाय भलामोठा दंडही डोक्मयावर बसला. ज्या संबंधातले ज्ञान नाही, त्यात नाक खुपसण्याचा प्रयत्न जुही चावलाच्या असा अंगलट आला आहे.