कोकण-गोवा, कोल्हापूर, सांगली, साताऱयापर्यंत मान्सूनची मजल
पुणे / प्रतिनिधी
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे शनिवारी महाराष्ट्रात आगमन झाले. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागात मान्सून सक्रिय झाला असून, त्याच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण तयार झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. वेळापत्रकाच्या दोन दिवस आधीच आनंदसरी राज्यात बरसल्याने शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गोव्यासह दक्षिण महाराष्ट्रात मान्सून साधारणतः 7 जूनच्या आसपास दाखल होतो. मात्र, दोन दिवस अगोदरच संपूर्ण कर्नाटक, गोव्यासह, महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनने प्रगती केली. कोल्हापूर, रत्नागिरी जिह्यातील हर्णेसह सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिह्याच्या काही भागात तसेच कर्नाटकातील कर्नूल, तिरूपती, कुड्डालोरपर्यंत मान्सूनने मजल मारली आहे.
अंदमान निकोबार बेटांवर यंदा एक दिवस उशिराने दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘यास’ चक्रीवादळाने मान्सूनचा वेग काहीसा वाढविला. मात्र, नियमित वेळेच्या (1 जून) आधी 31 मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्मयता असतानाच मोसमी वाऱयांसाठी पोषक स्थिती नसल्याने मान्सूनचे केरळातील आगमन लांबले. अरबी समुद्रावरून येणाऱया वाऱयांचे प्रवाह सक्रिय झाल्यानंतर गुरूवारी (ता. 3) दक्षिण केरळात मोसमी पावसाचे आगमन झाले. दुसऱयाच दिवशी मान्सूनने वेगाने वाटचाल करत संपूर्ण केरळसह कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग, कर्नाटकचा दक्षिण अंतर्गत भाग, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तसेच बंगालच्या उपसागरच्या काही भागात प्रगती केली.
मान्सून एक्सप्रेस सुसाट
वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारी दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिह्याच्या काही भागात तसेच कर्नाटकात मोसमी वारे पोहोचले आहेत.
ईशान्य भारतातही दाखल होणार
येत्या 24 तासांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागासह, ईशान्य भारतात मान्सून दाखल होण्याची शक्मयता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात सर्वसाधारण म्हणजेच 101 टक्के पाऊस पडण्याची शक्मयता आहे. तर महाराष्ट्रासह मध्य भारतात 106 टक्के पावसाची शक्मयता आहे.
मोसमी पावसाने बळीराजा सुखावला
यंदा पूर्व मोसमी पावसाने कृपा केल्याने शेतीपूर्व कामे बऱयापैकी आटोपली आहेत. आता मान्सून वेळेआधीच मुक्कामी आल्याने बळीराजा सुखावला आहे. कोविडमुळे वातावरण काहीसे निराशेचे असताना मोसमी पावसाच्या आगमनाने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.