अशोक गायकवाड यांचा इशारा
प्रतिनिधी/ सातारा
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संबंधित रिलायन्सच्या ठेकेदाराने यंत्रणा मॅनेज केली असल्याने आवाज उठवूनही कामे केली जात नाहीत. त्यामुळे गुरुवार दि. 9 सप्टेंबर रोजी आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करत टोल नाका बंद पाडण्याचा इशारा रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी साताऱयात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, सर्वपक्षीय नेते यांनी या आंदोलनात सहभाग घेतला तर ते जनतेच्या हिताचे ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, ठेकेदाराने सर्व राष्ट्रीय यंत्रणा मॅनेज केली आहे. शेजारच्या जिह्यातील कामे बंद आहेत, मग साताऱयात का सुरू आहेत. सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात येणार असून हा सामाजिक प्रश्न सुटला पाहिजे त्यांनी एकत्र यावे, कोणीही यावे.
खड्डेभरे पर्यंत बंद ठेवा, गेल्या चार दिवसात दहाहुन अपघात झाले आहेत. ठिकठिकाणी खड्डे आहेत, खडी, डबर ठेकेदारावर कारवाई करून टोल बंद करा, दोन दिवसात बैठक लावून निर्णय नाही झाला तर परिणाम होणार आहेत. मनुष्यवधाचे गुन्हे तत्काळ दाखल करा, आंदोलन करू भूमिका मान्य आहे त्यांनी बरोबर यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य कर्मचाऱयांना कमी करु नका
आरोग्य यंत्रणेने कर्मचारी कमी केले आहेत. तिसरी लाट सैनिक घरी पाठवून आपण युद्ध जिकणार आहे, डोके फिरलेय का? जाग्यावर आणण्यासाठी रिपाइं मैदानात उतरणार आहे. खुर्चीवर बसून देणार नाही. प्रशासन सज्ज असताना हकनाक बळी गेले आहे. त्यामुळे कर्मचारी पुन्हा बोलवावेत, अन्यथा पुढील युद्धात विजय होणार नाही, दिलेले आदेश मागे घ्यावेत, जो आंदोलनाला येणार नाही त्याला पुन्हा पार्टीत थारा नाही. सामान्य माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे राज्य जनतेचे नाही, आम्ही सज्ज आहोत.