प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पार्टीने आज पणजी, तालीगांव आणि परिसरात कार्यरत असलेल्या 200 हून अधिक रिक्षा चालकांना मोफत रेशन किटचे वाटप केले. आपचे नेते वाल्मीकि नाईक आणि सेसिल रॉड्रिग्ज यांनी उमा वोळवोईकर, अरविंद तेंडुलकर, सरफराज अंकलगी, दत्ताराम मेनकर, शारा भानू आणि इतरांच्या समवेत या मोहिमेचे संयोजन केले.
नाईक म्हणाले की, त्यांनी त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी विविध रिक्षा स्टॅण्डना भेट दिली आणि हे समजले की रिक्षाचालकांना कोविड आणि लॉकडाऊनमुळे त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
इंधन दरवाढ, भाववाढ इत्यादीमुळे मासिक खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याशिवाय ईएमआय, विमा, रस्ता कर इत्यादींचा बोझा देखील त्यांच्यावर आहे. यासह निश्चित बाजारपेठ, पर्यटन आणि दुकाने पूर्णपणे बंद झाल्याने उत्पन्न घटले.अश्या वेळी बरेच वाहन चालक घरीच राहणे पसंत करतात, कारण फक्त रिक्षा स्टॅण्डवर थांबून त्यांना इंधन आणि काही कप चहाचा आगाव खर्च करावा लागतो, परंतु दिवसभर एकही ग्राहक मिळत नाही. “, नाईक म्हणाले की, तातडीने दिलासा देण्यासाठी आजची मोहीम ही एक पहिली छोटी पायरी होती.
नाईक म्हणाले की, महामारीच्या संपूर्ण वर्षभरात भाजप सरकारने रिक्षाचालकांची दिशाभूल करून केवळ वाईट परिस्थिती निर्माण केली होती.
“सावंत सरकारने त्यांच्याकडून मागील वषी भरपाईसाठीचे अर्ज भरुन काढले, परंतु त्यांना एक रुपयाही वाटला नाही. यावषी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी क्रांती दिनाच्या निमित्ताने रिक्षाचालकांना भरपाईची भव्य घोषणा केली, पण प्रत्यक्षात कोणालाही काहीही मिळाले नाही “, नाईक म्हणाले.
आपने या समस्या समजल्या आणि सर्वाना त्वरित दिलासा मिळावा यासाठी वेळेवर पाऊल उचलले, याबद्दल सर्व रिक्षाचालकांनी कौतुक व्यक्त केले.