प्रतिनिधी/ म्हापसा
ऑक्सिजनवेळी आम्ही आवाज उठविला विरोधकांचा रोल आवाज उठविणे आहे आणि तो आवाज ऐकून घ्यावा की नाही हा सरकारचा निर्णय आहे. सुरवाती पासून आम्हाला सरकारने विश्वासात घेऊन काम केले असते तर हे दिवस आले नसते. कोविड फैलावला नसता आणि लोक मृत्यूही पडले नसते. अशी माहिती विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हापसा काणका येथे दिली.
एका कार्यक्रमास ते उपस्थित राहिले असता पत्रकारांशी कामत बोलत होते. यावेळी समाजसेवक दत्ताराम पेडणेकर, राजेंद्र घाटे, बाबी बागकर, तारक आरोलकर, सुधीर कांदोळकर, अनिल कुमार नागवेकर, नितीन लुंगुडकर, पार्वती नागवेकर आदी उपस्थित होते.
कोविडबाबत विरोधक टिका करून थकले. आपण एप्रिल महिन्यातच लॉकडाऊन करा असा आग्रह धरला होता. व आरटीपीसी आर चाचणी सक्तीची करण्याची मागणी आपण केली होती. मात्र आपले कुणीही ऐकले नाही. वकील संघटनेने जेव्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा उच्च न्यायालयाने आरपीसीआर चाचणी राज्यात बंधनकारक असल्याचा निवाडा दिला तेव्हा सरकराचे डोळे उघडले. पाच वर्ष आपण स्थीर राज्य दिले. आज स्वतः आरोग्य मंत्री सांगत आहे 26 जण ऑक्सिजनमुळे मृत्यू झाले तेव्हा लोकांना कळाले की, ऑक्सिजनमुळे लोक मृत पावले त्यापूर्वी किती लोक दगावले देवास माहीत. ही आज परिस्थिती आहे.
सरकारने राज्यासाठी पॅकेज द्यावी
सहा महिन्यापूर्वी कोविडचे वारे आले होते तेव्हा आपण मागणी केली होती 100 लोकांची पॅकेज द्या म्हणून. खाणसाठी आम्ही पॅकेज दिले. सरकारकडे काहीच नाही, धंद्याची वाट लागली आहे. अन्य सरकारने खाजेवाले, रीक्षावाल्यांना पॅकेज दिली. केंद्राने 300 कोटी दिले म्हणतात मात्र काहीच नाही.
विरोधक निवडणुकीस सामोरे जाण्यास तयार
विरोधक सदैव निवडणुकीत जाण्यास तयार असतात. मला खात्री आहे लोकांनी कोविडची तळमळ पाहिली आहे. खाट नाही, ऑक्सिजन नाही म्हणून मृत्यू पोचले आहे. गोवेकर यावेळी आपल्या कोनसेसला पाहून मतदान करणार आहे कारण गोवेकरांनी सर्वकाही भोगले आहे.
काँग्रेसची बेझ चाळीसही मतदारसंघात आहे
काँग्रेसचे भवितव्य कुठेच जा नाही. या राज्यात प्रत्येक मतदारसंघ काँग्रेसचा मतदार फिक्स आहे. काँग्रेसचा सहजासहज हालत नाही. काँग्रेसची बेझ या चाळीसही मतदारसंघात आहे असे कामत म्हणाले.
खासगी इस्पितळात डिडीएसव्हाय योजना पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. जी रक्कम आहे ती अवघ्या पाच दिवसात संपते. काहीजण चाळीस दिवस राहतात. त्यांचा अन्य दिवसांचा खर्च कोण करणार. महाराष्ट्रात गरिबाचा खर्च सरकार करते. असे गोव्यातही व्हायला पाहिजे. सरकारला गरीब लोकाबद्दल कळकळ असायला पाहिजे तेव्हाच हे सरकार अशा योजना काढू शकते असे कामत म्हणाले.
माणूस मरतात त्या ठिकाणी भाजप टिका उत्सव करतात- राजेंद्र घाटे
आज माणूस मरतात व भाजप टिका उत्सव करतात. यासाठी प्रथम ऑक्सिजन सिलींडर द्या. अवघ्या 400 रुपयांसाठी आमचे गोवेकर मृत्यू पोचत आहेत ही शोकांतिका आहे. आज कोण रुग्णवाहिका, जेवण, सॅनिटायझर देतात. आज काँग्रेस सरकार असते तर ही परिस्थिती आली नसती. कोविडवर हे सरकार घोटाळा करून धंदा करते असे शिवोली मंडळ अध्यक्ष राजेंद्र घाटे म्हणाले.