प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई संस्थेच्या राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे ‘शहीद दिवस’ नुकताच आचरण्यात आला. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांचे स्मरण करणे अगत्याचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी मौन पाळून आदरांजली वाहिली. प्राचार्या डॉ. शोभा नाईक, प्रा. विजयकुमार पाटील, डॉ. हरिश कोलकार, डॉ. चंद्रशेखर मुन्नोळी, प्रा. सविनय शिमनगौडर, अधीक्षक चिकमठ व उपस्थितांनी भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन केले. प्रा. एम. एन. पाटील यांनी आभार मानले.