बांदा/ प्रतिनिधी-
इन्सुली गावात तेरोखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि गावात होत्याचे नव्हते झाले,अनेकांना लाखोंचे नुकसान सोसावे लागले,काही जणांचे तर वर्षेभरातील पुंजीचे जीवनावश्यक साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले,इन्सुली सरपंच गंगाराम उर्फ तात्या वेंगुर्लेकर आणि त्यांचा मुलगा युवा उद्योजक केतन वेंगुर्लेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील कुडवटेंब येथील ८० पुरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंची मदत केली.गावातील इतरही पुरग्रस्तांंना ज्यांना खरोखरच गरज आहे अशांना मदत करण्याचा आपला मानस असल्याचे सरपंच वेंगुर्लेकर यांनी सांगितले.