मालवण/प्रतिनिधी –
क्यार, महाचक्रीवादळामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करू न शकलेल्या सागरी मच्छीमारांसाठी राज्य सरकारने ॲागस्ट २०२० मध्ये ६५ कोटी रुपयांचे आर्थिक पॕकेज जाहीर केले होते. या आर्थिक पॕकेजपासून वंचित राहिलेल्या रापण व्यावसायिक मच्छीमारांनी दांडी समुद्रकिनारी गुरूवारी सकाळपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे . तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते कमलेश कोचरेकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी राज्य शासन आणि मत्स्य विभागाच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली. मच्छीमाराचा जीव गेल्यावर शासनाला जाग येणार का आसा सवाल त्यांनी उपस्थित केला.