मंत्री उदय सामंत यांची माहिती
सांगली/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचा माॅप अप राऊंडमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी मुदतवाढ मिळवून देण्यासाठीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले. सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची डॉ. संजय पाटील, संभाजी पोळ, योगेश पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
या मॉप अप राऊंड चा निकाल दि. 4 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता लागणार आहे. तसेच हा निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळालेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांना त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 रोजी 21 तासात मिळालेल्या ठिकाणी जाऊन त्याचा प्रवेश निश्चित करायचा आदेश होता. हे कुठल्याही विद्यार्थ्याला जाऊन प्रवेश निश्चितीकरण करणं सोपं नव्हतं. सांगलीच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले आणि अडचण विद्यार्थ्यांची त्यांना पटवून देण्यात आली. मंत्रीमहोदयांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून यासाठीची असणारी एकवीस तासाची मुदत रद्द करून जवळजवळ दोन दिवसाची मुदत वाढवून दिली. या निर्णयामुळे सांगलीतील नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे व विद्यार्थ्यांचे निकालानंतरची होणारी पळापळ, थांबणार आहे. मंत्रीमहोदयांनी जागेवर हा निर्णय घेतल्यामुळे उपस्थित असलेल्या मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्याने त्यांना धन्यवाद दिले. त्यांचा बुके देऊन सत्कार केला व महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले. यावेळेस बजरंग भाऊ पाटील, सुजाता इंगळे, रमेश पवार, अली नालबंद, अमोल कांबळे, रुपेश मोकाशी, प्रदीप कदम आदी शिवसैनिक बांधव उपस्थित होते.