प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिऱया येथे अडकलेल्या एमटी बसरा स्टार जहाजाचा तळ पूर्णपणे फुटला आहे. त्यामुळे आता हे जहाज भंगारात काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र या जहाजाची भंगार म्हणून सुमारे 2 कोटी एवढी रक्कम मिळत नाही, तोपर्यंत जहाजाचा मुक्काम मिऱया येथेच राहणार असल्याची माहिती मिळत आह़े सद्यस्थितीमध्ये जहाजाचा तळ पूर्णत: फुटल्यामुळे जहाजाची दुरुस्ती अशक्य आहे, त्यामुळे जहाज भंगार करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांनी सांगितल़े
जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसून एमटी बसरा स्टार मिऱया किनारपट्टीवर लागल़े तेव्हापासून जहाजातील 13 खलाशांचा मुक्कामही येथे आह़े या जहाजातील खलाशांना गेले 4 महिने पगारही दिला नसल्याचे समोर आले आह़े अद्यापही हे 13 खलाशी मुरुगवाडा येथे जहाजाजवळच एका घरात भाडय़ाने राहत आहेत. दुबईस्थित जहाजाच्या मालकांने या खलाशांच्या दोनवेळच्या जेवणाची तजवीज आपल्या लखनोमधील मध्यस्थामार्फत करुन ठेवली आहे.
अजस्त्र लाटांमुळे जहाज खडकांवर आपटून जहाजाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आह़े जहाजाचा तळ पूर्णपणे फुटला आह़े जहाज आता स्क्रॅब केल्याशिवाय पर्याय नाही. आता हे जहाज सुस्थितीमध्ये बाहेर काढणे शक्य नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आह़े जहाजाच्या मालकाला हे जहाज भंगारमध्ये देण्यासाठी 1 कोटी 80 ची ऑफर आली होती, मात्र जहाजाचा मालक 2 कोटी रुपयांवर अडून बसला आहे. या अपघातग्रस्त जहाजाचा सर्व्हे करुन जहाज बाहेर काढण्यासाठी गेल्या आठवडय़ात इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन पुढाकार घेणार होत़े मात्र या बद्दल पुढे काय झाले, याबाबतची माहिती मिळू शकली नाह़ी मालकाला जोपर्यंत अपेक्षित स्प्रॅबची किंमत मिळत नाही, तोपर्यंत या जहाजासह जहाजावरील खलाशांचा मुक्काम मुरुगवाडा येथेच राहणार असल्याची शक्यता आह़े