केवळ प्रश्न करताच के. एस. ईश्वराप्पा हे सी. एम. इब्राहिम यांच्यावर भडकले : सभागृहात एकच गोंधळ
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यातील कंत्राटदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यातील आमदार व मंत्री 40 टक्के कमिशन द्यावे, अशी मागणी करत असल्याचा आरोप केला होता. तो प्रश्न विधानपरिषद सदस्य सी. एम. इब्राहिम यांनी मंगळवारी सभागृहात चर्चेसाठी घेण्याचे आवाहन केले. यावर सभापती बसवराज होरट्टी यांनी उद्या चर्चा करू, असे सांगितले. त्याचवेळी ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वराप्पा हे चांगलेच भडकले. तुम्हाला अटक झाली होती त्यानंतर तुम्ही राजीनामा देऊन गेला होता, याची आठवण करून दिली. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच उशीर खडाजंगी झाली.
पंतप्रधानांकडे तक्रार झाली. ही बाब अत्यंत गंभीर झाली आहे. मला अटक झाली असे तुम्ही सांगत आहात, मी राजीनामा दिलो. मात्र मी त्यामधून निर्दोष झालो आहे, हे लक्षात ठेवा. माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वजण लागला होता. मात्र काही निष्पन्न झाले नाही. आता तुम्ही राजीनामा देणार का? असा सवाल विरोधी पक्षाचे सदस्य इब्राहिम यांनी केला. हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे, असे म्हणत सभापतींना त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली.
सभापती बसवराज होरट्टी यांनी त्यावर चर्चा होईलच. मात्र त्यासाठी तुम्हाला उद्या वेळ दिली आहे, असे सांगितले. सी. एम. इब्राहिम यांनी केवळ यावर चर्चा करण्याची मागणी करताच मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे उद्या चर्चेवेळीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील कंत्राटदारांनी राज्य सरकार विरोधातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. 40 टक्के कमिशन मागितले जात आहे, असा आरोप झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली
होती.
दुपारच्या सत्रामध्ये यावर चर्चा होणार होती. मात्र सभापतींनी टाळली. ईश्वराप्पा आणि विरोधी नेत्यांमध्ये यावेळी मोठी खडाजंगी झाली. आता तुम्हीपण राजीनामा द्या, असे विरोधकांनी सुनावले. त्यामुळे के. एस. ईश्वराप्पाही निरुत्तर झाले होते. एकूणच या प्रश्नावरून सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्मयता नाकारता येत नाही.