पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन
वार्ताहर /झुआरीनगर
कचऱयाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अनेक पावलेही उचलण्यात आलेली आहेत. पंचायतीसुद्धा आपल्यापरीने कचरा विल्हेवाटीसाठी चांगले काम करीत आहेत. परंतु ही समस्या सोडवण्यासाठी लोकांचे सहकार्यही तितकेच महत्वाचे आहे असे प्रतिपादन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.
सांकवाळ पंचायतीच्या कचरा हाताळणी सुविधा प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी मंत्री गुदिन्हो बोलत होते. यावेळी कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर, उपसरपंच सुकोरिना वालीस, सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, पंच सदस्य नारायण नाईक, गिरीष पिल्ले, सुनिता बोरकर, कविता कमल, नंदिनी देसाई, आरीष कादर, सतीश पडवळकर, गोविंद लमाणी आदी उपस्थित होते.
सांकवाळ पंचायतीने उभारलेल्या या प्रकल्पात सुका कचरा हाताळण्यात येईल. परंतु ओल्या कचऱयाच्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी सुविधा उभारण्यात येईल. चिखली पंचायत क्षेत्रातही असाच प्रकल्प उभारण्यात येणार आहे व तो जास्त क्षमतेच असेल. कारण विमानतळ परिसरातील कचराही त्यात हाताळला जाणार आहे असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. आपण कचरा वर्गीकरण करून दिला पाहिजे. कारण तो पुढील प्रक्रियेसाठी अधिक सोपा होतो. सध्या पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. व त्याचबरोबर लोकसंख्या, इमारती, कॉलनीही वाढलेल्या आहेत. परिणामी कचऱयाची समस्याही सतावू लागते. आपला गोवा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे व कचऱयाचीही समस्या सोडविणे अत्यंत महत्वाचे आहे. आपले सरकार त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. परंतु त्यासाठी लोकांचेही सहकार्य महत्वाचे आहे असे पंचायत मंत्र्यांनी सांगितले.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व पंचायतक्षेत्रात कचरा हाताळणी प्रकल्प असणे गरजचे असल्याचे सांगितलेले आहे. या सुविधेमुळे कचरा गोळा करण्यात येईल व तो वर्गीकरण करून पुढील प्रक्रियेसाठी हाताळला जाईल. ओल्या व सुक्या कचऱयाचे वर्गीकरण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण कचऱयाची ही समस्या आपण आरोग्याशी जोडलेली आहे. तेव्हा सर्व पंचायत सदस्यांनीही आपआपल्या प्रभागातील कचरा वर्गीकरण होत आहे का यावर लक्ष ठेवले पाहिजे. कारण सर्वांनी जबाबदारीने वागल्यास व या प्रयत्नमुळे सांकवाळ हा निश्चितच स्वच्छ गाव होईल असे आमदार एलिना साल्ढाणा यांनी सांगितले.
सध्या सांकवाळ भागात अनेक ठिकाणी रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे दृष्टीस पडतात. तेव्हा या कचऱयाची समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. सध्या सुक्या कचऱयाची हाताळणी होणार आहे व काही दिवसांत ओल्या कचऱयावरही प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. व त्यासाठी 3 टी.पी.डी.चा प्लांट येणाऱया 15 ते 20 दिवसात बसविण्यात येणार आहे. त्यामुळे ओल्या कचऱयाचीही समस्य दूर होणार आहे. या सुविधांमुळे यापुढे सांकवाळ परिसर स्वच्छ होणार असल्याचे सरपंच रमाकांत बोरकर यांनी सांगितले.