बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील विविध भागात पूर आणि भूस्खलनामुळे कर्नाटकात सोळा लोक मरण पावले आहेत आणि चार अद्यापही बेपत्ता आहेत.
राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार मुसळधार पावसामुळे 12 जिल्हे पुरबाधित आहेत. १६ मृत्यूंमध्ये, चिकमंगळूर आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे. कोडगूमध्ये दोन मृत्यूची नोंद झाली आहे, तर धारवाड, हसन, उत्तर कन्नड, म्हैसूर, हवेरी आणि उडुपी याठिकाणी प्रत्येकी एक मृतांचा समावेश आहे.
राज्य सरकारने १०८ मदत छावण्या सुरू केल्या आहेत. तेथे विस्थापित झालेल्या ३,२४४ लोकांनी आश्रय घेतला आहे. तसेच सुमारे, ३३,४७७ हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि,३४,७९१हेक्टरवरील बागायती पिकांवर परिणाम झाला आहे.