बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात गेल्या २४ तासात ५,७८३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यासह आतापर्यंत राज्यात संसर्ग झालेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या २७,९६,१२१ वर पोहोचली आहे. तर यापैकी २६,२५,४४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण ३३,६०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी ५,७८७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर याच वेळी १५,२९० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तसेच कोरोनामुळे १६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या १,३७,०५० रूग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात शुक्रवारी मृत्यु दर १.२० टक्क्यांवर पोहोचला होता, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९३.८९ टक्के आणि कोरोना पॉझिटिव्ह दर (टीपीआर) ४.०५ टक्के होता.
दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी १,१०० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आतापर्यंत एकूण १२,०३,०६३ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहेत. तर ११,१३,८०८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १५,४१० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिह्यात सध्या ७३,८४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बेंगळूर शहरात रुग्ण बरे होण्याचा दर ९२.५८ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.२८ टक्के आहे.