बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने बंद असलेली महाविद्यालये १७ नोव्हेंबरपासून (अभियांत्रिकी, पदविका, पदवी) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे.
दरम्यान विद्यार्थी ऑफलाइन, ऑनलाइन किंवा मिश्रित शिक्षण सत्रामध्ये जाण्याचा पर्याय निवडू शकतात. पूर्वीच्या नोंदणीच्या आधारे बॅचच्या क्षमतेचा निर्णय घेतला जाईल. कोरोना आणि त्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे लागू आहेत आणि त्यांची अंमलबजावणी होईल याची खात्री करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये टास्क फोर्स तैनात करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अश्वथनारायण सी. एन. यांनी सांगितले.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यातील सध्याच्या साथीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरमधील उच्च शिक्षण, आरोग्य, वाहतूक, समाज कल्याण, वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.