बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान कर्नाटकात बालविवाहामध्ये मोठी वाढ झाली आहे. कर्नाटक राज्य बाल संरक्षण हक्क आयोग (केएससीपीसीआर) च्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांत (एप्रिल-जुलै) राज्यात राज्यात १०७ बालविवाहाची नोंद झाली आहे. तर गेल्या वर्षी बालविवाहाच्या १५६ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. वर्षभराच्या तुलनेत हे प्रमाण कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे प्रशासन यासंदर्भात कोणते पाऊल उचलणार याकडे लक्ष आहे.
केएससीपीसीआरचे अध्यक्ष डॉ. सेबॅस्टियन अँथनी यांनी जेव्हा प्रशासन राज्यभर कोरोना परिस्थिती हाताळण्यात व्यस्त होते, तेव्हा पालकांनी त्यांच्या मुलाचे लग्न करण्याचा सर्वात योग्य काळ असे असा विचार केला असे त्यांनी म्हंटले आहे.
डॉ. अँथनी यांनी नोडल एजन्सीने संकटग्रस्त मुलांसाठी मार्च ते जून या काळात राज्यातील बालविवाहाच्या संबंधित ५५० पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केला असल्याचे म्हंटले आहे.