सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी अतिवृष्टीने द्राक्षबागासह अनेक पिकांना मोठा फटका बसला आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर येथे ज्वारी, मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे सध्या पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. आगोदरच अडचणीत असणारा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि विविध रोगाच्या प्रादुर्भावमुळे शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. आता लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने अंतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत . तसेच या भागामध्ये कृषी विभागाच्या वतीने कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही तसेच अधिकारी सुध्दा फिरकत नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.