काँग्रेसला भिकेचे डोहाळे लागले आहेत असे नि÷ावंत कुजबुजत आहेत तर मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ अभियानाला यशस्वी करण्यासाठी गांधी परिवारच कामाला लागला आहे असे टीकाकार म्हणत आहेत. राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्या अप्रत्यक्ष नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेसमध्ये दिवाळी साजरी होण्याऐवजी धुळवड सुरू झाली आहे.
‘दैव देते आणि कर्म नेते’ असे म्हणतात. काँग्रेसच्याबाबत काहीसे असेच घडताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा ग्राफ अभूतपूर्वरित्या खाली घसरला असताना विरोधी ऐक्मयाची मोट बांधली जाणार असे चित्र दिसत होते. सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीस 19 विरोधी पक्षांनी हजेरी लावून भाजपला अस्वस्थ केले होते. अशा वेळी जीर्णशीर्ण झालेल्या काँग्रेसमध्ये नवीन बळ यायला पाहिजे होते, नव्या शक्तीचा संचार व्हायला हवा होता आणि नव्या दमाने सत्ताधाऱयांच्या विरोधात रणनीती आखण्याची उभारी यायला पाहिजे होती. पण
ग्रँड ओल्ड पार्टी म्हणून ओळखल्या जाणाऱया या पक्षात प्रत्यक्षात काही उलटेच होताना दिसत आहे. काँग्रेसला भिकेचे डोहाळे लागले आहेत असे नि÷ावंत कुजबुजत आहेत तर मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ अभियानाला यशस्वी करण्यासाठी गांधी परिवारच कामाला लागला आहे असे टीकाकार म्हणत आहेत.
सध्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या अप्रत्यक्ष नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेसमध्ये दिवाळी साजरी होण्याऐवजी धुळवड सुरू झाली आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाब, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये वेगवेगळय़ा प्रकारचा राडा सुरू झाला आहे आणि त्याला प्रामुख्याने जबाबदार राहुल आणि प्रियांकाच आहेत असे स्पष्टपणे दिसत आहे. आपण आता ‘ओसाड गावचे पाटील’ झालो आहोत हे ते विसरले आहेत आणि त्यांनी आपली पूर्वीचीच पाटीलकी चालू ठेवल्याने काँग्रेसशासित राज्यात गंभीर संकटे उभी ठाकली आहेत. राहुल हे नावालाच इंदिरा गांधींचे नातू आहेत. आपल्या आजीची राजकीय समज नसूनही ते आजीसारखे वागायचा प्रयत्न करत असल्याने काँग्रेस संकटात आहे. गेल्याच आठवडय़ात राहुल यांच्या जवळच्या म्हणून ओळखल्या जाणाऱया सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षातील खदखदच बाहेर आणली. यावषी झालेल्या आसामच्या निवडणुकीत राहुलनी सुष्मिताना तिकीटवाटपात विश्वासात घेतले नव्हते आणि नंतर त्यांना भेटदेखील नाकारली होती. सुष्मिता यांचा वापर त्रिपुरा आणि आसाममध्ये आपल्या पक्षाचे ठीक बस्तान बसवायला ममता बॅनर्जी करू शकतात. त्रिपुराच्या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारदेखील बनवले जाऊ शकते. गेल्या वषी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्याने मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार गडगडले. शिंदे यांना राज्य सभेचे सदस्यत्व हवे होते आणि ते देण्यात राहुलनी फारसा रस न दाखवल्याने कमलनाथ सरकार कोसळले. अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहत असलेल्या सोनिया गांधींना आजार आणि वयोमानामुळे आपल्या मुलांनी मांडलेला उच्छाद शांतपणे पाहणे भाग पडत आहे. विरोधी पक्षांचे ऐक्मय घडवायचे असेल तर केवळ सोनियाच घडवू शकतात असे पक्षातील जुनेजाणते छातीठोकपणे सांगत आहेत. याचाच अर्थ राहुल आणि प्रियांकाला राजकीय परिपक्वता अजून आलेली नाही आणि लवकर येणारही नाही असेच अप्रत्यक्ष सांगणे होय. सोनियाना राहुलच्या हाती पक्ष दिल्यावर एकप्रकारे निवृत्तीच पाहिजे होती पण मुलाने अचानक पक्षाध्यक्षपद सोडल्याने त्यांना परत अंतरिम अध्यक्ष होणे भाग पडले आहे. गांधी घराण्याला सत्ता सोडायची नसते हा काँग्रेस विरोधकांचा आरोप फारसा चुकीचा नाही.
काँग्रेसमधील दरबारी राजकारण अजिबात कमी झालेले नसल्याने पक्षातील नि÷ावंत बेजार झालेले आहेत. राहुल यांनी हात ठेवल्याने के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला हे दोन सरचिटणीस शक्तिशाली झाले आहेत, वादग्रस्त झाले आहेत. त्याने पक्षातील बजबजपुरी वाढली नसती तरच नवल होते. सोनिया आणि राहुल यांना भेटण्यासाठी वेणुगोपाल यांच्या परवानगीशिवाय जाता येत नसल्याने पक्षातील अस्वस्थता वाढत आहे. काँग्रेस चालवण्याची सुवर्णसंधी आयतीच मिळाली तरीही राहुल आपल्याच कोषात आहेत. मोदींनी दोनदा केलेल्या दणदणीत पराभवामुळे तळागाळापासून पक्ष परत बांधायची राहुलना आवश्यकता होती. देश पूर्णपणे पिंजून काढून पिचलेल्या वर्गाचा मसीहा ते बनू शकले असते. पण तसे झालेले नाही. नेत्याने आपले वैयक्तिक राग-लोभ बाजूला ठेवायचे असतात आणि संघटनेकरता लहानथोर सर्वांचे सहकार्य मिळवायचे असते. राहुल प्रियंका यांचे राग-लोभ प्रचंड आहेत. त्यामुळेच त्यांना आवडणाऱया पण राजकीयदृष्टय़ा अपरिपक्व अशा नवज्योतसिंग सिद्धूला त्यांनी पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. सिद्धू म्हणजे ’आधीच मर्कट तयातची मद्य प्याला’ अशा प्रकारचा मामला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग त्यामुळे भडकले असणे साहजिकच आहे. राहुल आणि प्रियंकाच्या आशीर्वादामुळे सिद्धू चेकाळले आहेत. काल परवापर्यंत पंजाबमध्ये काँग्रेस परत सत्तेत येणार असे स्पष्ट दिसत होते. आता पक्षच दुभंगला गेला आहे व त्यामुळे पाडापाडीचे राजकारणाला फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱया निवडणुकात ऊत येणार आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या असताना त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी राहुलनी छत्तीसगढमध्ये आपल्याच नेतृत्वाला पायउतार करण्याचा उपक्रम सुरू करून पक्षात वादळ माजवले आहे. मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांना खुर्ची अजिबात सोडायची नाही तर त्यांचे आरोग्यमंत्री सिंगदेव हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांचे बंड शांत झालेले असले तरी आत भरपूर धुसफूस सुरू आहे. एक मात्र खरे की एक प्रखर मोदी विरोधक अशी प्रतिमा मात्र राहुल यांनी बनवली आहे. ममता बॅनर्जी सोडल्या तर प्रादेशिक पक्षांचे सारे नेते हे ‘जरा हटके, जरा बचके’ अशी भूमिका घेत असल्याने मोदी विरोधात त्यांना नेतृत्व करण्याची ना हिम्मत आहे ना महत्त्वाकांक्षा. राहुल आणि प्रियंकानी जमिनी स्तरावर राजकारण करत मोदींना सर्वप्रकारे शह देण्याचे काम पुढील दोन वर्षात केले नाही तर काँग्रेसला 2024 ला देखील सत्तेत येता येणार नाही.
सुनील गाताडे