प्रतिनिधी / बेळगाव
एपीएमसी बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक मंदावलेली पहायला मिळाली. शनिवारच्या आठवडी बाजारात कांदापात, लालभाजी, पालक व मेथीची आवक कमी होती. इतर भाजीपाल्यांचे दर देखील मागील आठवडय़ाच्या तुलनेत स्थिर होते. श्रावण महिन्यामुळे पालेभाज्यांची मागणी वाढली असली तरी पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो, बिनीस व कोथ्ंिांबीर दर मात्र घसरले आहेत. टोमॅटो 10 रू. किलो तर कोथिंबिर 10 रूपयांना तीन पेंडय़ाप्रमाणे विकली जात होती.
शनिवारच्या किरकोळ बाजारात टोमॅटो 10 रू. किलो, ढबू 20 ते 25 रू.किलो, फ्लॉवर 15 रू. ला एक, ओली मिरची 30 रू. किलो, काकडी 30 रू. किलो, वांगी 60 रू. किलो, दोडकी 50 रू. किलो, भेंडी 30 रू. किलो, बिनीस 30 रू. किलो, कारली 40 रू. किलो, कोबी 15 रू. ला एक, बटाटा 15 रू. किलो, कोथिंबीर 10 रू. तीन पेंडय़ा, आले 80 रू. किलो तर लसूण 100 रू. किलो दराने विक्री झाली. बिनीस दर मात्र 60 रूपयांवरून 30 रूपयांपर्यंत घसरला आहे.
किरकोळ बाजारात शनिवारी एका विपेत्याकडे अळंबी दिसून आली. पावसाळय़ाच्या दिवसात नैसर्गिकरित्या उगविलेल्या अळंबीला बाजारात विशेष मागणी असते. बाजारात दाखल झालेल्या अळंबीचा दरदेखील अधिक होता आणि मागणीदेखील होती.
भाजीपाल्याचे दर स्थिर
मागील आठवडय़ाच्या तुलनेत काही भाजीपाल्याची आवक कमी झाली असली तरी दर मात्र स्थिर आहेत. श्रावणामुळे पालेभाज्यांची मागणी वाढली असली तरी आवक घटली होती.
मागील महिन्याभरापासून कमी-जास्त होणाऱया खाद्यतेलाचे दर शनिवारी स्थिर होते. मागील पंधरा दिवसांपूर्वी पाम आणि सोयाबिन तेलाच्या दरात प्रतिकिलो 5 ते 10 रुपयांची वाढ झाली होती. तर मागील सहा महिन्यात भरमसाठ तेलाचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत दर मात्र थोडय़ा फार प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे तेलापासून बनविणाऱया पदार्थांच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत.