नमन सावंत धावस्कर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पर्वरी
साहित्यनिर्मिती कसदार होण्यासाठी प्रखर सामाजिक जाणीव असणे गरजेचे आहे. यासाठी निर्भय होणे,हर एक समाज घटकांशी सलग्न राहणे,कृतीशील जीवन जगताना भरपूर वाचन करणे,ज्ञान वृध्द?िगत करणे ही पंचतत्व अवलंबण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन नमन सावंत धावस्कर यांनी संमेलनाध्यक्ष या नात्याने केले.
21 व्या कोंकणी युवा साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर पर्वरी मतदारसंघाचे आमदार रोहन खंवटे, गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष अरूण साखरदांडे,उपाध्यक्ष वसंत भगवंत सावंत,भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे प्रादेशिक अधिकारी राकेश कुमार,स्वागताध्यक्ष तथा विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भुषण भावे, कार्याध्यक्ष दर्शन कांदोळकर उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा साहित्य वाचनावर प्रतिकुल परिणाम होत आहे.ही चिंताजनक बाब आहे.खरं पाहता,तंत्रज्ञानाचा वापर करून साहित्य कृती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे.त्याचा आपण योग्य वापर करणे काळाची गरज आहे.कोंकणीतील अक्षर वाङमय ऑडीओ बुक च्या माध्यमातून वाचकापर्यंत गेल्यास तरूण पिढी कोंकणी साहित्याकडे आकृष्ट होईल. “असे उद्गार आमदार रोहन खंवटे यांनी काढले.
डॉ.भुषण भावे यांनी प्रास्ताविक केले.राकेश कुमार,वसंत भगवंत सावंत यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. संजय वालावलकर यांनी आमदार रोहन खंवटे यांना श्रीफळ,शाल आणि स्मृतीपर भेट देऊन सन्मानित केले.त्यानंतर विमला पै पुरस्कार प्राप्त उदय म्हांबरो यांचा अरूण साखरदांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. युवा पुरस्कार पुरस्कार प्राप्त संपदा कुंकळ्ळकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संमेलनाच्या दुसऱया दिवशी कथा, कविता,पुस्तक परिक्षण,व्यक्तिचित्रण या चार कार्यशाळांचे आयोजन करण्यात आल्या होत्या.कथा विभागासाठी अंजू साखरदांडे,अजय बुवा,ज्योती कुंकळ्ळकार यांनी परिक्षक म्हणून काम केले.या सत्राचे सुत्रसंचालन अद्वैत साळगावकर यांनी केले.कविता विभागासाठी उदय म्हांबरो,पूर्णानंद च्यारी,नूतन साखरदांडे यांनी परिक्षक म्हणून काम केले.या सत्राचे सुत्रसंचालन नम्रता देसाई यांनी केले.पुस्तक परिक्षण विभागासाठी डॉ. हनुमंत चोपडेकर,शैलेंद्र मेहता, कृपाली नायक यांनी परिक्षक म्हणून काम केले. या सत्राचे सुत्रसंचालन मानसी धावस्कर यांनी केले.व्यक्तीचित्रण विभागासाठी रमेश घाडी,दिलीप बोरकर,दिलीप धारगळकर यांनी परिक्षक म्हणून काम केले.या सत्राचे सुत्रसंचालन ऐश्वर्या नायर यांनी केले..या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक तीन बक्षिसे देण्यात आले.त्याचबरोबर संमेलनासाठी परिश्रम केलेल्या लहान थोरांचाही यावेळी प्रेमाची भेट देऊन गौरव करण्यात आला.संमेलनाध्यक्ष श्रीमती नमन सावंत धावस्कर यांच्या हस्ते लामण दिवा प्रतिक म्हणून पुढील संमेलनाच्या मानकर्?यांना देण्यात आला. कार्याध्यक्ष दर्शन कांदोळकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि या दोन दिवसीय कवी संमेलनाची सांगता झाली.या सत्राचे सुत्रसंचालन प्रा.योगिता चोडणकर यांनी केले.