सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने मालमत्तेवरून केयरटेकच्या दाव्यासंबधी मोठा निर्णय दिला आहे. एक केयरटेकर/नोकर स्वतःच्या दीर्घकाळापर्यंत कब्जानंतरही मालमत्तेवर कधीच दावा करू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. घरमालकाने सांगताच केयरटेकर किंवा नोकरला घर किंवा मालमत्ता रिकामी करावी लागणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी सत्र आणि उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला आहे.
कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने घरमालकाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करत न्यायाधीश अजय रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सत्र न्यायालयाने याप्रकरणी स्पष्ट पणे चूक केल्याचे म्हटले आहे. केयरटेकर किंवा नोकर स्वतःच्या दीर्घकाळापर्यंतच्या कब्जानंतरही मालमत्तेत कधीच अधिकार प्राप्त करू शकत नाही. केयरटेकर किंवा नोकराला मालकाच्या सूचनेनंतर त्वरित कब्जा मोकळा करावा लागेल असे खंडपीठाने म्हटले आहे.