सांगरूळ /प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे राजस्थानातील बिकानेर येथील जवाहर नवोदय विद्यालयात कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील एकवीस विद्यार्थी अडकले असून या विद्यार्थ्यना तातडीने त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत आणावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र मेल वरून केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाने सर्वत्र भयभीत वातावरण असून शालेय विद्यार्थी आपल्या कुटुंबापासून दूर असल्याने या मुलांच्या मधून व कुटुंबीयांच्या मधून चिंतेचे वातावरण पसरले आहे. आ.पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना भ्रमणध्वनीवरून या गंभीर बाबीत लक्ष घालण्याची विनंती करतानाच राजस्थानातील कोटा येथून विद्यार्थ्यना तातडीने परत आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले आहेत .
पडवे (जि.रत्नागिरी)येथील नवोदय विद्यालयात शिकणारे कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील एकवीस विद्यार्थी बिकानेर येथील नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी पाठवले आहेत. हे विद्यार्थी दिनांक 2एप्रिल रोजी परतणार होते.मात्र लॉकडाउनमुळे हे विद्यार्थी अडकले आहेत. शालेय स्तरावरील ही मुले अडकल्यामुळे पालकांची गेली महिनाभर घालमेल सुरू आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गाने सर्वत्र हाहाकार माजवला असल्याने या मुलांचे कुटुंबीय काळजीत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पालकांची धडपड सुरू असून आपल्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. त्यामुळे या बाबतीत व्यक्तीशः लक्ष घालून त्यांना तातडीने परत आणावे अशी मागणी आ.पाटील यांनी केली आहे. कोटा येथे उच्च शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी अडकले होते.याबाबत आ.पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यानी तातडीने या विद्यार्थ्यना परत आणण्याची व्यवस्था केली याबददल आ. पाटील यांनी ना. ठाकरे यांचे भ्रमणध्वनीवरून आभार मानले आहेत.
राजस्थानातील कोटा येथे लॉक डाऊन मुळे अडकलेल्या विद्यार्थ्यना तातडीने परत अन्याची आपण मुख्यमंत्र्यांच्या कडे भ्रमणध्वनीवरून मागणी केली आहे. या मागणीचा विचार करून शासनाने या विद्यार्थ्यांना तातडीने कोल्हापूरला पाठविले .राजस्थानातील बिकानेर येथे नवोदय विद्यालयात अडकलेल्या कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील एकवीस विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळे जिल्ह्यात पाठवण्याची विनंती मुख्यमंत्री नामदार ठाकरे यांना केली आहे .हे विद्यार्थीही त्यांच्या मूळ जिल्ह्यात लवकरात लवकर परत येतील. – आमदार पी एन पाटील ( सडोलीकर )