वारणानगर / प्रतिनिधी
आनंदनगर,कोडोली ता. पन्हाळा येथे रहाणाऱ्या आरोही संदीप नायकवडी वय ९ या इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेल्या शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. .आरोही ही सकाळी अंगणात खेळत असताना पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करीत तिला फरफटत नेले त्यामुळे आरोही ला गंभीर जखमा देखील झाल्या असून कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोहीची आई आणि शेजारी याच्या मुळे आरोही हिची भटक्या कुत्र्याच्या पासून सुटका झाली. कोडोलीची लोकसंख्या ५० हजारावर आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या देखील मोठी आहे या भटक्या कुत्र्यांनी यापूर्वीही अनेकांना जखमी केले आहे मटण मार्केट, हॉटेल व इतर काही ठिकाणी ही कुत्र्यांची टोळकी बसून आहेत रात्री अपरात्री या भागातून जाणे म्हणजे जीव मुठीत घेवून जावे लागते कोडोली ग्रामपंचायतीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या माध्यमातून जोर धरू लागली आहे.