बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यात तब्बल ५२ मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. तर एक हजाराहून अधिक मुलांनी एक पालक गमावला असल्याची महिला व बाल विकास मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली आहे.
मंगळवारी कोरोनाच्या तिसर्या लाटेदरम्यान मुलांच्या संरक्षणासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. दरम्यान मुलांच्या कल्याणासाठी सरकारने बाल सेवा योजना व बाल हिताशी योजना राबविली आहे.
मंत्री म्हणाले की, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली. बाल सेवा योजनेंतर्गत प्रत्येक मुलास दरमहा ३५०० रुपये व मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. पात्र मुलांना एकतर लॅपटॉप किंवा टॅब्लेट मिळेल. २१ वर्षांवरील मुलींना १ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.