विश्वासार्हतेसाठी मीच पहिल्यांदा टोचून घेणार : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना विषाणूवरील भारतीय लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत विकसित होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. तसेच या लसीच्या विश्वासार्हतेविषयी शंका असल्यास सर्वप्रथम मी ही लस टोचून घेईन, असेही त्यांनी सांगितले. एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोनाची सद्यस्थिती, केंद्र सरकार त्यासाठी करत असलेल्या उपाययोजना आणि कोविडनंतर असणारी जागतिक परिस्थिती अशा विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच लसीची सुरक्षा, उपलब्धता, कोल्ड स्टोरेज, उत्पादनाची वेळ-काळ अशा मुद्यांवर देखील सखोल चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
कोरोनावरील लस कधी येणार, याची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र, 2021 च्या पहिल्या तिमाहीत ही लस विकसित होईल. लस विकसित झाल्यानंतर ती सर्वप्रथम जीव धोक्मयात असलेल्या रुग्णांना दिली जाईल. या लसीसाठी कोण किती पैसे मोजू शकते, हा निकष ग्राह्य धरला जाणार नाही, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
कोरोनाविरोधी लसीसाठी होणाऱया मानवी चाचण्यांच्यावेळी योग्य ती काळजी घेतली जात आहे. तसेच लसीची निर्मिती करणाऱया तज्ञ डॉक्टरांच्या समूहाकडून देशातील जास्तीत जास्त लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कशाप्रकारे निर्माण करायची, याची रणनिती आखली जात असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले. कोरोनाची लागण झालेले ज्ये÷ नागरिक आणि प्रकृती चिंताजनक असणाऱया रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी या लसीला तातडीने मंजुरी देण्याचा विचारही सरकार करत आहे. यावर एकमत झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटाला लवकरात लवकर कोरोना व्हायरसवरील लस उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सरकार कोरोना लसीला जलदगतीने मान्यता देण्याचा विचार करत आहे. सर्वाधिक धोका असलेल्या गटामध्ये ज्ये÷ नागरिक, आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांचा समावेश होतो. भारतात तीन लसी चाचणीच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर आहेत. यात सिरम निर्मिती करत असलेली ऑक्सफर्डची लस, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि झायडस कॅडिलाची लस आहे.