प्रतिनिधी / कोल्हापूर
अतिवृष्टी आणि महापूरामुळे महावितरणच्या कळे उपविभागातील विद्युत यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. कृषीपंपांना वीज पुरवठा करणारे नदीकाठावरील शेकडो विद्युत खांब जमीनदोस्त झाले. पाण्यात बुडलेली रोहित्रे पूर्णपणे नादुरुस्त झाली. त्यामुळे ही वीज यंत्रणा कधी सुरळीत होणार ? असा शेतकऱयांपुढे प्रश्न निर्माण झाला होता. पण कळे उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटणकर यांनी ऑक्टोबरच्या पुर्वार्धात पावसाचे प्रमाण कमी होताच ठेकेदार विठ्ठल पाटील यांना काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पाटील यांनी कोलमडलेली वीज यंत्रणा सुरळीत करण्याचे काम तत्काळ सुरु केले असून ऑक्टोबर अखेरीस कळे उपविभागातील बहुतांशी कृषीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.
महावितरणच्या कळे उपविभागात अनेक ठेकेदार काम करतात. या सर्व ठेकेदारांनी महापूर काळात पडझड झालेली वीज यंत्रणा सुरळीत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. पण काही ठेकेदारांच्या परजिह्यातील कामगारांनी पलायन केल्यामुळे कामांचा अतिरिक्त भार ठेकेदार पाटील यांच्यावर पडला आहे. तरीही त्यांनी वीज यंत्रणा सुरळीत करण्याचा सपाटा लावला आहे. दररोज दोन ते तीन गावातील कोसळलेले खांब उभारुन वीज तारा जोडल्या जात आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच हे काम सुरु केल्यामुळे बहुतांशी गावांतील शेतकऱयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर ज्या गावांत अद्याप कामे अपूर्ण आहेत, त्या गावांतील शेतकऱयांतून नाराजीचा सुरु उमटत असला तरी आपल्या कामागारांच्या कार्यक्षमतेच्या पुढे जाऊन ठेकेदार पाटील यांच्याकडून काम सुरु आहे. त्यामुळे येत्या आठवडÎाभरात धामणी खोऱयातील सर्व कृषीपंप सुरु होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारा `ठेकेदार'
ठेकेदार विठ्ठल पाटील हे शेतकरी कुटूंबातील असल्यामुळे त्यांना बळीराजाच्या व्यथा आणि अडचणी माहिती आहेत. अपुरे उत्पन आणि वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱयांचे दुख त्यांनी जवळून पाहीले आहे. वीज पुरवठÎाअभावी कृषीपंप बंद असल्यामुळे महापूरातून बचावलेल्या पिकांना पुन्हा पाणी टंचाईचा फटका बसू नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच कृषीपंपाचा वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची मोहिम पाटील यांनी हाती घेतली आहे.