औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण : गोकुळ, जिल्हा बँकेची धाकधुक वाढली
प्रतिनिधी / कोल्हापूर
संपूर्ण राज्यातील सहकार वर्तुळाचे लक्ष वेधलेल्या सहकारी संस्थांच्या `कट-ऑफ डेट’ संदर्भातील औरंगाबाद खंडपीठासमोरील अंतिम सुनावणी सोमवारी पूर्ण झाली असुन बुधवार १० रोजी याबाबतचा फैसला होणार आहे. या निकालावर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची दिशा ठरणार असल्याने निवडणूक होऊ घातलेल्या जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँकेसह चार हजार सहकारी संस्थांची धाकधुक वाढली आहे. बीड, परभणी, नांदेड जिल्हा बँकानी ही याचिका दाखल केली आहे.
२०१९ ला निवडणूक होणाऱ्या संस्थांची मतदार यादी तयार करताना संस्था सभासदांसाठी तीन तर व्यक्तीसाठी दोन वर्षापुर्वीची मतदार संख्या ग्राहÎ धरण्यात आली. २०१९ ला मुदत संपलेल्या संस्थांसाठी २०१७ ची मतदार संख्या विचार घेतली गेली दरम्यानच्या काळात कर्जमाफी आणि कोरोनामुळे एक वर्ष मुदतवाढ मिळाली, या काळात संस्था. सोसायटी संचालक कर्जमाफीमुळे कर्जमुक्त झाले. सरकारने आपल्या सोयीसाठी मुदतवाढ दिली. हा नियम आम्हालाही लागू केला पाहिजे. मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. याच काळात संचालक मंडळाने प्रतिनिधींचे ठराव केले. पण सध्या ते कर्जदार आहेत. त्यांची नावेही मतदार यादीतून वगळण्यात यावीत हे दोन मुद्दे प्रामुख्याने उपस्थित झाले आहे. कट ऑफ डेट २०१८ ग्राह्य धरण्यात येवून नव्याने ठराव मागवण्यात यावेत अशी मागणी करीत बीड, परभणी, नांदेड येथील जिल्हा बँकानी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाच्या नोटीसवर राज्य सरकारने यापूर्वी म्हणने सादर केले आहे. सोमवारी न्यायमूर्ती गंगापूर यांच्या समोर अंतिम सुनावणी झाली. बुधावारी निर्णय होणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर कार्यवाही सहकार विभागाने स्थगिती उठवली आहे. मात्र प्राधिकरणाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. औरंगाबाद न्यायालयात काय निर्णय होते हे पहावे लागेल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक केल्हापूर |