वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथे वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे वारणा नदी परिसरातील असणार्या शेकडो एकर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेती क्षेत्रात व नदी परिसरात राहिला असणाऱ्या बांधीव घरांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान,पडझड झाली आहे. परिणामी सदर बुडीत ठिकाणांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने गावकामगार तलाठी यांना दिले असून,आकाराने व विस्ताराने मोठे असणाऱ्या कुंभोज गावकामगार तलाठी यांची नेमणूक हातकणंगले तहसीलदार यांनी इंचलकरंजी येथे पूरग्रस्त पंचनाम्यासाठी केली असून, कुंभोज येथे अद्याप काही पंचनामे मोठ्या प्रमाणात अपुण असल्याने ते पंचनामे करण्यासाठी तलाठी किंवा शासकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे.
कुंभोज गाव कामगार तलाठी यांना कुंभोज येथेच राहून पंचनामे करण्याचे आदेश. हातकणंगले तहसिलदार यांनी द्यावेत अशी मागणी कुंभोज ग्रामस्थातुन तसेच शेतकरी संघटनेच्यावतीने होत आहे.
परिणामी पंचनामे करत असताना. शासनाच्या नियमाप्रमाणे पूरग्रस्त परिसरातील पाण्याखाली असणारी घरे व जमिनी या नियमावलीप्रमाणे पंचनामे करण्यात यावेत, त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकारण करण्यात येऊ नये. परिणामी शासनाने सर्वसामान्य पूरग्रस्त नागरिकाला जाहीर केलेल्या नुकसान भरपाईचा पुरेपूर लाभ देण्यात यावा. अशी मागणी वारणा नदीकाठी बुडीत असलेले शेतकरी तसेच बुडीत असलेल्या वसाहतींमध्ये घरमालकांच्या वतीने होत आहे. परिणामी बऱ्याच वेळा पुरामध्ये बुडलेल्या घराचे पंचनामे झाले ,परंतु त्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही, अशीही तक्रार काही नागरिकांच्या वतीने करण्यात आली.
परिणामी आकाराने विस्ताराने मोठे असणाऱ्या कुंभोज गावचे पंचनामे अद्याप अपूर्ण असूनही तहसीलदार कार्यालय हातकणंगले यांनी कुंभोज गाव कामगार तलाठी यांची इचलकंरजी येते नेमणूक केली असून सदर नेमणूक तात्काळ रद्द करण्यात यावी व कुंभोज येथील उर्वरित असणारे पंचनामे निपक्षपातीपणे पूर्ण करणाचे करावेत,व बुडीत शेतकरी व नागरिकांना न्याय मिळावा अशीही मागणी जोर धरत आहे.