प्रतिनिधी / शिरोळ
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी तज्ञांच्या मते काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचे तंतोतंत पालन करून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.
शिरोळ येथील संजीवनी क्लिनिक उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर बोलत होते अध्यक्षस्थानी दत्त सहकारी साखर कारखान्यांच अध्यक्ष गणपतराव पाटील होते. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे, गोकुळचे माजी चेअरमन दिलीप पाटील, जि. प. सदस्य अशोकराव माने, भाजपाचे अनिलराव यादव, पृथ्वीराज यादव आदी प्रमुख उपस्थित होते.
बोलताना आरोग्य राज्यमंत्री डॉ. पाटील-यड्रावकर पुढे म्हणाले, डॉक्टर अमोल पाटील यांनी पुणे येथून येऊन कुणाच्या घरात रुग्णांना दिलासा दिला आहे. हे सेवावृत्तीने केले सामाजिक काम निश्चितच कौतुकास्पद आहे. अमोल पाटील यांच्यासारख्या कर्तुत्ववान युवकांनी वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करून सामान्य रुग्णांची सेवा करावी ही सेवा अनमोल आहे असे सांगुत ते पुढे म्हणाले, राज्याचे आरोग्य विभाग एका बाजूला कोरोनाच्या काळात या आरोग्य विभागाला विशेष महत्त्व आले आहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे आरोग्य विभागात प्रगती झाली आहे.मात्र कोरोनाची अध्याप पिछेहाट झालेली नाही. यावर ठोस उपाय निघालेले नाहीत त्यामुळे नागरिकांनी मास्क सॅनीटायझरचा वापर करून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा व आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.
यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, डॉक्टर अमोल पाटील यांचे कार्य सेवाभावी वृत्तीचे आहे. दत्त कोविड केअर सेंटरमध्ये त्यांनी कोरोना रुग्णांची सेवा केली आहे कोरोनाच्या काळात माणुसकी संपते की काय असे वाटत असताना डॉ. अमोल पाटील यांच्या माध्यमातून माणुसकीचा झरा या परिसराला मिळाला आहे असेही ते यावेळी म्हणाले.