म्हासुर्ली / वार्ताहर
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढ असून धामणी खोऱ्यातीत ही मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढ आहे. मात्र धामणी खोऱ्यातील प्रमुख बाजार पेठ केंद्र असलेल्या म्हासुर्ली (ता.राधानगरी) येथे गेल्या दोन – तीन महिन्यापासून कोरोना बाधित गावातील काही व्यापारी बेकायदेशीर पणे गावात येऊन बाजार चौकात रविवारचा आठवडी बाजार भरवत होते.परिणामी व्यापारी व ग्राहक विना मास्क तसेच सोशल डिस्टन्सिगचे पालन न करता खेरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते.त्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होऊन म्हासुर्ली पंचक्रोशीतील जनतेचे आरोग्य धोक्यात आले होते.
त्यामुळे गावातील संतापलेल्या तरुणांनी ग्रामपंचयात कामगार व सदस्यांना सोबत घेत बेकायदेशिर पणे भरविण्यात आलेला बाजार उधळून लावला. तर कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या काही गावातील व्यापाऱ्यांना तरुणांनी अटकाव करत उभारले स्टॉल काढण्यास लावून त्यांच्या वाहनातून त्यांच्या गावी माघारी लावून दिले.
बाजारात अचानक घडलेल्या प्रकाराने सर्वत्र काही काळ गोंधळाची स्थिती तयार होऊन काही वेळ वातावरण गंभीर बनले होत. मात्र बाहेरील व्यापाऱ्यांनी समयसूचकता दाखवत सर्व दुकांनाचे स्टॉल गुंडाळून वाहनांसह गावातून जाणे पसंत केले असून सध्या गावातील मोजक्याय व्यापाऱ्यांना ताडपत्रीचे स्टॉल नउभारता टेम्पोतूनच भाजीपाला विक्री करण्यास सांगितले आहे. तसेच गाव व बाजार पेठेत विना मास्क फिरणाऱ्यावर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.