प्रतिनिधी/कोल्हापूर
पूर्ववैमनस्यातून दोघा तरुणांचा पाठलाग करून निर्घुन खून केल्याप्रकरणी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. तर एकाची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अमोल नंदू हळदीकर असे याचे नाव आहे. रेल्वे उड्डाण पूल परिसरात 2 फेब्रुवारी 2014 ला हा खून झाला होता.
जयदीप उर्फ हणामा राजू चव्हाण, साहिल उर्फ घायल लक्ष्मण कावळे, रियाज उर्फ काल्या सदरू देसाई, विशाल सागर गिरी, फारुक अहमद शेख, सद्दामहुसेन नजीर देसाई, इम्रान राजू मुजावर, धनाजी वसंतराव मिसाळ, रोहित सुधीर कांबळे (सर्व रा. टेंबलाईवडी व विक्रम नगर परिसर) अशी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्याची नावे आहेत. टेंबलाईवाडी उड्डाणपूल येथे 2 फेब्रुवारी 2014 ला पाठलाग करून नितीन महादेव शिंदे आणि समीर सिराज खाटीक यांचा निर्घुण खून करण्यात आला होता.
Previous Articleकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सपत्नीक घेतली कोरोनाची लस
Related Posts
Add A Comment