प्रतिनिधी / कोल्हापूर
युवक कॉंग्रेसने भाजप राज्य कार्यकारिणी सदस्याच्या घरासमोर आंदोलन केले, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष काहीही बोलले नाहीत, कारण त्यांच्याही घरासमोर आंदोलन झाले. मग राज्य कार्यकारिणीतील सदस्यालाच ते का झोंबले, मुश्रीफ यांना पालकमंत्री करा, अशी मागणी करणार्या विरोधकांना पालकमंत्री बदलणे हा पंपावरील माणूस बदलण्याइतके सोपे वाटते काय, असा प्रश्न पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. ज्यांना जनतेने पावणेतीन लाखांनी निष्क्रीय केले, त्यांनी दिल्लीतील बंगला का सोडला नाही, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. ते म्हणाले, युथ कॉंग्रेसच्या आंदोलनावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, अशी आंदोलने होत असतात, हे भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांना माहिती नाही काय? पालकमंत्र्यांवर टीका हा त्यांचा प्रसिद्धीचा स्टंट आहे. पण पालकमंत्री बदलाची मागणी करून त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असल्याचे सर्टिफिकेट दिले आहे. भाजपचा राज्य कार्यकारिणी सदस्य महाविकास आघाडीचे समर्थन करतो, यात आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्हाला जनतेने पावणेतीन लाखांची निष्क्रिय केले आहे. तरीही तुम्ही दिल्लीतील बंगला अजून सोडला नाही, तो का ठेवलाय, याचा खुलासा करा, प्रदेंश उपाध्यक्ष पदावरून तुम्हाला साखर सेलवर आणले, यातून तुम्ही निष्क्रियता शोधा. तुमच्या कारखान्यातील कामगारांच्या तक्रारी आहेत, तुमच्या कारखान्याची साखर जप्त झाली आहे, असा आपला कारखाना वाचवू न शकलेला तज्ञ भाजपच्या साखरेशी निगडीत धोरणावर काय मत मांडणार, असा प्रश्न पालकमंत्री पाटील यांनी केला.
शेतकर्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी निश्चित धोरण आखले आहे. यासंदर्भात बैठकही झाली आहे. हा निर्णय लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष धक्क्मयातून आता कुठे सावरले आहेत, त्यामुळे त्यांच्या बदल्यांसंदर्भातील आरोपाला आघाडीच्या नेत्यांनी उत्तर दिल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.