-85 बंधारे अद्याप पाण्याखालीच, पंचगंगेची पाणीपातळी 44 फुटांवर स्थिर
10 राज्यमार्ग ,28 प्रजिमा अद्याप बंद
प्रतिनिधी/कोल्हापूर
शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी शहरासह जिह्यातील पूरस्थिती कायम आहे. शनिवारी दिवसभरात पंचगंगेच्या पाणीपातळीत केवळ 9 इंचांनी घट झाली असून 44 फुटांवर स्थिर आहे. राधानगरी धरणाच्या दोन दरवाजांसह वीज गृहातून 4 हजार 256 तर अलमट्टी धरणातून 2 लाख 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिह्यातील 1 राज्यमहामार्ग, 10 राज्यमार्ग आणि 29 प्रमुख जिल्हा मार्ग बंद असून 85 बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत. कोल्हापूर शहरातील पूरस्थितीत सुधारणा होत असून महापूराचा धोका तूर्तास टळला आहे. रविवारी (9 ऑगस्ट) कोल्हापूर जिह्यामध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अतिवृष्टी, महापूर आणि वादळी वाऱयामुळे 10 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून 3 लाख 17 हजारांचे नुकसान झाले आहे. तर 294 खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असून 98 लाख 93 हजारांचे नुकसान झाले आहे.जिह्यात इतरत्र पावसाची उघडीप असली तरी धरणक्षेत्रात मध्यम ते जोरदार पाऊस सुरु आहे.. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 97.50 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये – करवीर 15.73, कागल 17.57, पन्हाळा 31.86, शाहूवाडी 33, हातकणंगले 7.13, शिरोळ 4.71, राधानगरी 76.83, गगनबावडा 97.50, भूदरगड 34, गडहिंग्लज 24.14, आजरा 50.75, व चंदगड तालुक्यात 52.67 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
जिह्यातील 85 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली असून भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, ,शिरगाव, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे हे सहा बंधारे, तुळशी नदीवरील बीड व आरे हे दोन बंधारे, वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी, कोंडोली, माणगाव, खोची व शिगाव, दानोळी व चावरे व मांगले-सावर्डे हे 9 बंधारे , कासारी नदीवरील करंजफेण, करंजफेण, पेडाखळे, बाजार भोगाव, वाळोली, पुनाळ-तिरपण, ठाणे-आळवे व यवलूज हे सात बंधारे पाण्याखाली गेले असून कुंभी नदीवरील कळे, शेणवडे, मांडूकली व वेतवडे हे 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवी नदीवरील पाटणे, सवते-सावर्डे, व शिरगाव हे तीन बंधारे, वेदगंगा नदीवरील बस्तवडे, वाघापूर, निळपण, कुरणी, सुरुपली व चिखली हे सहा बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील गिजवणे, निलजी, साळगाव, खंडाळ व ऐनापूर हे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा नदीवरील पिळणी, बुजूर भोगोली, हिंडगाव, कानडी सावर्डे व अडकूर हे पाच बंधारे, ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी आणि कुर्तनवाडी हे दोन बंधारे, दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सूळकुड, बाचणी व सिद्धनेर्ली हे चार बंधारे, कडवी नदीवरील पाटणे, सवते-सावर्डे, शिरगाव हे तीन बंधारे, धामणी नदीवरील सुळे, आंबर्डे ,म्हासुर्ली, गवशी, पणोरी व गवशी हे 6 बंधारे, वेदगंगा नदीवरील बस्तवडे, वेदगंगा,नंद्याळ, वादापूर, निळपण, कुरणी, सुरुपली व चिखली हे सहा बंधारे, जांबरे नदीवरील कोकरे, नावेली, उमगाव हे तीन बंधारे पाण्याखाली गेले असून एकूण 85 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.
धरणांतील पाणीसाठा (टक्केवारीमध्ये)
धरणे टक्sकवारी
राधानगरी 99
दुधगंगा 85
वारणा 86
तुळशी 79
कुंभी 84
कासारी 89
पाटगाव 90
घटप्रभा 100
जंगमहट्टी 100
चित्री 80
चिकोत्रा 64
कोदे ल.पा. 100
जांबरे 100