प्रतिनिधी / गारगोटी
दोन दिवस भुदरगड तालुक्यात जोराचा पाऊस पडत असून धरण क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होत आहे.तर वाघापूर, निळपण,गारगोटी, शेण गाव, म्हसवे ,आकुर्डे हे सहा बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.
पाटगाव, चिकोत्रा, फये धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे,सोसाट्याच्या वार्यासह पाऊस पडत असल्याने ऊस पिक पुर्ण कोलमडले आहे तर भात पिकांना जीवदान मिळाले असून भातासाठी हा पाऊस पोषक आहे.गेल्या चोवीस तासात पाटगावात १०५ मि मी मीटर पाऊस झालेला आहे तर धरण ७८.०४% भरले आहे.
पाटगावातून विसर्ग करण्यात आलेला नाही तरी सुध्दा वेदगंगा नदीला पूर आलेला आहे नदीचे पाणी दुसर्यांदा पात्राबाहेर पडलेले आहे.
सहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे.