गोलमेज परिषदेतील मागण्यांची शासनाकडून दखल सुरेशदादा पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द झाल्या सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी मिळाला. हे गोलमेज परिषदेचे यश आहे. गोलमेज परिषदेत ‘महाराष्ट्र बंद’ला दिलेली हाक सरकारने गांभीर्याने घेतली आहे. आता आरक्षणावरील संगीतही लवकरच उठेल अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समिती समन्वयक सुरेशदादा पाटील यांनी पत्रकार परिषद दिली. या पत्रकार परिषदेत सुरेशदादा पाटील, विजयसिंह महाडिक, भरत पाटील, सचिन साठे, शिवाजी लोंडे, उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुरेशदादा पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे राज्यव्यापी गोलमेज परिषद झाली होती. सदर परिषदेस महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि 53 मराठा संघटनांचे प्रमुख उपस्थित राहिले होते. सदर परिषदेमध्ये 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा देण्यात आला होता. याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली 8 ऑक्टोंबर रोजी शासनाने आम्हाला चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मराठा समाजाच्या शासनाने 10 मागण्या मंजूर केल्या आहेत. शासन मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याने महाराष्ट्र बंदची घोषणा स्थगित करण्यात आली होती. महाराष्ट्र बंद स्थगित करता आला तरी शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन मागण्या मान्य केल्या त्यामुळे महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचे असे पाटील म्हणाले. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही व नोकरी भरतीला स्थगिती मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्यात येणार असल्याचे बाबतचा इशारा सदर पत्रकार परिषदेत देण्यात आलेला आहे.