वार्ताहर/म्हासुर्ली
म्हासुर्ली पैकी भित्तमवाडी (ता.राधानगरी) येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळली. यात बळवंत सुभाना भित्तम (वय – ४५) या तरुण शेतकऱ्याच्या दुदैवी मृत्यू झाला.
सध्या धामणी खोऱ्यात अतिवृष्टी सुरु असल्याने शेतशिवारात ओढे नाल्यांचे पाणी शिरत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. आज सकाळी भित्तम हे शेतात येणारे पाणी बंद करण्यासाठी शेताकडे गेले होते. यावेळी शेतातील बांध अतिवृष्टीमुळे घसरून थेट बळवंत यांच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. याबाबत राधानगरी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.