गोकुळ शिरगाव / प्रतिनिधी
कोल्हापूर विमानतळावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत दिनांक १४ जानेवारी २०२२ ला मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याची सुरुवात झाली. या पंधरावड्यात मराठी विषयक व्याख्यान, निबंधलेखन आणि कविता वाचन यांसारखे उपक्रम राबविले गेले. “लाखो करोडो रुपये खर्च करून भाषा मोठी होत नसते तर ती बोलती ठेवल्याने भाषा मोठी होते” अशाप्रकारच व्याख्यान देऊन डॉ. नंदकुमार मोरे, मराठी विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी उपस्थित श्रोत्यांना मराठी भाषा आणि तीच महत्व पटवून दिल.
मराठी भाषेविषयी केलेलं व्याख्यान हे या पंधरावड्याच मुख्य आकर्षण ठरलं. तसेच या दरम्यान घेण्यात आलेल्या निबंध आणि कविता स्पर्धेत विमानतळावरील दोन मुस्लिम बांधव कर्मचाऱ्यांनी बाजी मारली. विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन आणि आयोजकांचे आभार मानून या पंधरावड्याची दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी सांगता करण्यात आली. या उपक्रमाची माहिती कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणचे कमल कुमार कटारिया यांनी दिली,